“बीडमध्ये पीक विमा नाकारला; किसान सभेचा आंदोलनाचा इशारा, 17,500 रुपयांची भरपाई रखडली”

डिजिटल बीड | प्रतिनिधी कंपनीधार्जिनी पीक विमा योजना रद्द करा; बीडमध्ये किसान सभेचा आंदोलनाचा इशारा बीड, लातूर आणि धाराशिव या मराठवाड्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पीक विमा प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची पिके आणि शेती जमीन उद्ध्वस्त झाली होती. मात्र, या नैसर्गिक आपत्तीनंतरही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे पीक विमा … Read more

बीडमध्ये खत माफियांवर मोठी कारवाई; २० विक्रेत्यांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची कडक भूमिका

बीड प्रतिनिधी/ डिजिटल बीड बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने मोठी आणि धडक कारवाई करत २० खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, खत विक्रीत सुरू असलेल्या अनियमिततेवर लगाम लावण्याचा प्रशासनाचा स्पष्ट संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. … Read more

१ मे ला सरकारी नोकरीचं गिफ्ट? बीडमध्ये मोठी भरती अपडेट

बीड जिल्ह्यातील ग्रामीण प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रियेला आता निर्णायक वळण मिळाले आहे. बीड उपविभागात रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, १ मे महाराष्ट्र दिनी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उपविभागीय अधिकारी कविता जाधव … Read more

“३० हजारांच्या लालसेत अडकला अधिकारी!” बीडमध्ये मोठा ट्विस्ट

डिजिटल बीड प्रतिनिधी बीडमध्ये ३० हजारांची लाच घेताना प्रभारी अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात! बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, शासकीय यंत्रणेतील गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालवण चौक परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अचूक सापळा रचत शासकीय निरीक्षणगृहाचे प्रभारी अधीक्षक कपिल भीमराव कांबळे याला ३० … Read more

पाणी नाही म्हणून वस्ती त्रस्त; प्रशासनाला जाग कधी येणार?गप्पेवाडीत पाणी असूनही वस्ती तहानलेली! नेमकं चाललंय काय?

विशेष प्रतिनिधी/ केज बीड जिल्ह्यातील गप्पेवाडी गावात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. गावामध्ये दोन-दोन सरकारी पाईपलाईन व्यवस्था अस्तित्वात असतानाही बाराभाई वस्ती आणि महादेव वस्ती येथील नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे गावाच्या मुख्य भागात मुबलक पाणीपुरवठा होत असताना या दोन वसत्यांकडे मात्र प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले … Read more

ई-केवायसी नसल्यास पगार थांबणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा इशारा

राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची सूचना समोर आली आहे. राज्य शासनाने आता सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास एप्रिल २०२६ महिन्याचा पगार थांबवण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनात मोठी हालचाल सुरू झाली असून सर्व विभागांना … Read more

आष्टी तालुक्यात ११ ग्रामपंचायत जागांसाठी पोटनिवडणूक; राजकीय वातावरण तापलं, मोठे बदल होण्याची शक्यता

संदिप सोनवणे उपसंपादक डिजीटल बीड न्युज चॅनल आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ११ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवरील समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे.पींपळगाव घाट, सुलेमान देवळा, ठोबळसांगवी, बिड सागवी, देविनिमगाव, डोगरगण, पींपळा, कडा, सावरगाव … Read more

समाजक्रांतीचे शिल्पकार: महात्मा ज्योतिबा फुले यांचा प्रेरणादायी प्रवास

समाज क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे भारताच्या सामाजिक समाजक्रांतीचे प्रणेते म्हणून इतिहासात नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करून समाजातील अन्याय, अंधश्रद्धा आणि जातीय विषमता दूर करण्यासाठी अखंड संघर्ष केला. त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजाला नवचैतन्य मिळाले आणि समानतेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल … Read more

केज परिसरात रोजगार आणि जमीनमूल्य वाढण्याची शक्यता

डिजिटल बीड विशेष मुंबई ते लातूर प्रवास आता ५ तासांत; केजजवळून जाणाऱ्या ‘जनकल्याण’ महामार्गाचे संरेखन पूर्णमहाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणाऱ्या कल्याण-लातूर ‘जनकल्याण’ महामार्ग प्रकल्पाला अखेर महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून या ४५० किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे संरेखन (Alignment) पूर्ण करण्यात आले असून, आता हा प्रस्ताव राज्य सरकारच्या … Read more

धक्का बसलाच! लाडकी बहीण योजनेत ७१ लाख महिला अपात्र

digital beed २१,३०० कोटींचा निधी वादात; एप्रिलपासून अपात्र लाभार्थ्यांचे मानधन बंद महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेत तब्बल ७१ लाख महिला अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.महिला व बालविकास विभागाने अलीकडेच हाती घेतलेल्या ई-केवायसी (e-KYC) … Read more